logo

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या मालाचे नुकसान भरपाई देण्यात यावी

डॉ प्रा मिनाक्षि सावळकर.

यवतमाळ(उमरखेड)‌ वसीम शेख :
दीनांक2/5/2024 विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस 26/27/2024येऊन गेला यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि महागाव या ठिकाणी अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मालांचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .पण अद्याप पाव कोणत्याही अधिकारी बांधावर गेलेला नसून शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाचे नुकसानीची पाहणी करून पंचनामे करून त्यांचे किती प्रमाणात नुकसान झालं यांची चौकशी करून त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी आज उमरखेड येथे माननीय एसडीओ यांना निवेदन देण्यात आले, निवेदन देताना डॉ प्रा मिनाक्षि सावळकर , प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यकारणी सदस्य ,पीसीसी मेंबर महागाव, निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभाग अमरावती जिल्हा विभागीय अध्यक्ष , रूपाळा सरपंच रहमान खान पठाण सरस्वती ठाकूर निराधार सचिव यवतमाळ जिल्हा शेख नबी संकेत डगमरे बाळू जाधव पाटील गजानन इंगळे दराठी प्रकाश जाधव विशाल राठोड आदि उपस्थित होते.

9
2696 views